उच्च व तंत्र शिक्षण विभाग,
महाराष्ट्र शासन

नवीन महाविद्यालय मान्यता प्रणाली

कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्व-विद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, १९९७ मधील कलम ६२ नुसार नवीन महाविद्यालयांसाठी अर्ज करणे, प्रस्ताव शासनाकडे पाठविणे, मान्यता देणे यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून ती खालीलप्रमाणे आहे:-

क्रमांक कार्यवाही कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्व-विद्यालय (विद्यापीठ) अधिनियमातील तरतुदीनुसार विहित कालमर्यादा शासन अधिसूचना दिनांक --/--/---- नुसार सुधारित कालमर्यादा
१. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय ,रामटेक या विद्यापीठातंर्गत नवीन महाविद्यालय ,विद्याशाखा ,अभ्यासक्रम विषय व अतिरिक्त तुकडी करिता संबंधित संस्था विद्यापीठास अर्ज सादर करतील. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी --/--/----
२. विद्वत परिषदेच्या मान्यतेने पात्र प्रस्ताव विद्यापीठांकडून राज्य शासनास शिफारशीत करण्यात येतील. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी किंवा त्यापूर्वी --/--/----
३. शासन मान्यता देण्याचा दिनांक १५ जून रोजी किंवा त्यापूर्वी --/--/----
क्रमांक टीप/Disclaimer
१. शासन अधिसूचनेद्वारे विद्यापीठास अर्ज सादर करणे, प्रस्ताव शासनास पाठवणे याबाबत कालमर्यादा सुधारित केल्या असल्यास त्याचे पालन करणे बंधनकारक राहील तसेच विहित केलेल्या कालमर्यदातील शेवटच्या दिवसाच्या रात्री १२ नंतर प्रणाली अर्ज स्वीकारणार नाही ,तसेच विद्यापीठांना प्रणालीद्वारे शासनाकडे प्रस्ताव पाठवणे शक्य होणार नाही.